स्वामी विवेकानंदांची प्रेरणादायी वाक्य | MPSC Plant


- एकाग्रतेने वाचन करा, एकाग्रतेसाठी आवश्यक आहे ती ध्यानधारणा, ध्यानधारणा केल्याने आपण इंद्रियांवर संयम ठेवू शकतो

- ज्ञान हा वर्तमान काळ आहे, मनुष्य त्याचा अविष्कार करतो ही बाब विसरु नका

- उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्हाला तुमची लक्ष्यप्राप्ती होत नाही

- जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत शिकणं बंद करु नका, अनुभव हा आपला गुरु आहे ही बाब विसरु नका

- लोक तुमची स्तुती करोत किंवा निंदा, लक्ष्य तुम्ही गाठण्याची तुमची वाट बिकट असो किंवा सुकर तुम्ही तुमचा योग्य मार्ग सोडू नका

- ज्या क्षणी एखादं काम करण्याची घोषणा कराल त्याच क्षणी ते काम सुरु करा नाहीतर लोकांचा तुमच्यावरचा विश्वास उडेल

- जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकत नाही तोपर्यंत तुम्ही देवावर विश्वास ठेवू शकत नाही

- एकावेळी एकच काम हाती घ्या आणि ते तडीस नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा, ते काम पूर्ण होईपर्यंत सगळ्या गोष्टी काही क्षणांसाठी विसरुन जा

- तुमचा संघर्ष जेवढा मोठा असेल तेवढेच मोठे यश तुम्हाला मिळेल हे लक्षात ठेवा

- ज्यादिवशी तुमच्यासमोर कोणतीही समस्या नसेल त्यादिवशी ही बाब निश्चित झाली असेल की तुम्ही चुकीच्या मार्गावर जात आहात


MPSC PLANET

Post a Comment

Previous Post Next Post